नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओमधून सांगितले पाण्याचे महत्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
 
 

 
 
 
 
पाणी हे जीवन आहे हे तर सगळ्यानाच माहित आहे. मात्र तरी देखील पाण्याचा वापर जितका हवा तितकाच करावा अति पाणी वाया घालवू नये या महत्वाच्या बाबी अजूनदेखील नागरिकांना लक्षात येत नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक पाणी दिनानिमित्त एक संदेश दिला आहे.
 
 
 
आज जगात सगळीकडेच पाण्याची समस्या ही महत्वाची समस्या मानली जात आहे. त्यामुळे पाणी हे जीवन आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील या पाण्याचा वापर करता आला पाहिजे यासाठी एका व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी हा सुंदर संदेश दिला आहे. दिवसेंदिवस माणूस पाण्याचा उपसा जमिनीतून करीत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी कमी होत चालली आहे.
 
 
यामुळे पुढील पिढीला तसेच आपल्याला देखील पाण्याची मोठी समस्या पार करावी लागू शकते यासाठी आत्ताच सजग होवून पाण्याचा हवा तेवढाच वापर करा आणि पाणी वाचवा असे नरेंद्र मोदी या संदेशात म्हणत आहे. 
@@AUTHORINFO_V1@@