बोदवड तालुक्यातील प्रत्येक शेतात दोन वर्षात पाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

आ.एकनाथराव खडसे यांची ग्वाही


 
बोदवड :
जिल्ह्यात नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत १४ तालुके समाविष्ठ केलेले आहे. बोदवड तालुक्यात अवजार बँक उभारणार असून त्यामुळे मशागती व अन्य कामे कमी वेळात व खर्चात होतील. शेतकर्‍यांचा वेळ, पैसा वाचेल व कमी खर्चात जास्त पीक घेता येणार आहे. नवीन तंत्रज्ञान ही काळाची गरज असून ती गरज या कंपनीमार्फत पूर्ण होणार आहे. ही कंपनी १०० टक्के सौर उर्जेवर चालणारी आहे. यामुळे परिसरातील गरजूना रोजगार मिळेल, असा विश्‍वास भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला आहे.
 
 
येथील खप्तीसन इंजिनिअरिंग प्रा.लि.या कंपनीचे नुकतेच उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शेती समृद्ध झाली तर शेतकरी समृद्ध होईल. बोदवड परिसर योजनेचे काम वेगाने सुरु असून दोन वर्षात पूर्ण होईल, अशी ग्वाही आ.खडसेंनी दिली. शेतकर्‍याला ५० ते १०० टक्के अनुदानावर गाई, बकर्‍या देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.खप्तीसन इंजिनिअरिंग कंपनीच्या माध्यमातून नवनवीन अवजार शेतकर्‍यासाठी बाजारात उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना यांचा लाभ होईल. उत्पादनात वाढ होण्यासाठी शेतील पाण्याची आवश्यकता आहे. बोदवड परिसर जलसिंचन योजनेचे काम वेगाने सुरु आहे, अशी माहितीही आ. खडसे यांनी दिली.

शेतकरी बांधवांनो, जा आणि पहा... - आमदगावपासून दोन कि.मी. अंतरावर हे काम सुरु आहे. ते काम पाहण्यासाठी शेतकर्‍यांनी जावे, असे आवाहनही आ.खडसे यांनी केले. दोन वर्षात मुक्ताईनगर मतदार संघातील प्रत्येक शेतकरी समृद्ध झाला तरच विकास होईल, असेही आमदार खडसे म्हणाले.

 
 
 
कार्यक्रमाला रामदास शिवहरे, माजी आ.ज्ञानेश्‍वर पाटील (शहापूर,म.प्र.) अविनाश कनिकर, निलेश अग्रवाल, कृषी तंत्रज्ञान राहुरी विद्यापीठाचे प्राचार्य तुलसीदास बाराखोड आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी हरिओम जैस्वाल, सौ.संध्या जैस्वाल, अजय जैस्वाल, धनराज जैस्वाल, आनंद जैस्वाल, अलोक जैस्वाल, साक्षी जैस्वाल आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन पुरुषोत्तम गड्डम यांनी केले.
 
@@AUTHORINFO_V1@@