चारा घोटाळा प्रकरण : चौथ्या खटल्यात लालू यादव दोषी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
रांची : चारा घोटाळ्याच्या चौथ्या खटल्यात राजद प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले आहे. आज झालेल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या सुनावणीत दुमका कोषागार प्रकरणी लालू यादव यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
 
 
 
चारा घोटाळ्याच्या सहा प्रकरणापैकी चार प्रकरणात लालू प्रसाद यादव हे दोषी आढळले आहे. तर या प्रकरणाच्या चौथ्या खटल्यात जगन्नाथ मिश्र यांना दोषमुक्त सिद्ध करण्यात आले आहे. चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा यांच्यासहित ३१ जणांना आरोपी ठरवण्यात आले होते.
 
 
न्यायालयाने १९ जणांना दोषी ठरवलं असून, १२ जणांची सुटका केली आहे. त्यामुळे आता लालू प्रसाद यांच्या शिक्षेवर २१, २२ आणि २३ मार्चला सुनावणी होणार आहे. 
 
 
 
काय आहे प्रकरण ?
 
चारा घोटाळा हा बिहारच्या राजकारणातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जातो. १९९६ मध्ये पशू खाद्यासाठी सरकारी खजिन्यातून ९५० कोटी रुपये घेण्यात आले होते, परंतु त्यावेळचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते जगन्नाथ मिश्र यांनी हे सर्व पैसे खाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. यानंतर भाजपने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती, यामध्ये लालू यांच्या हात असल्याचे दिसू लागल्यानंतर लालू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर न्यायालयाने त्यांना यात दोषी ठरवत या निवडणूक बंदी देखील घातली होती.
@@AUTHORINFO_V1@@