सफाई कामगारांच्या वसाहतींसाठी ‘आश्रय योजना’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |




सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास होणार


मुंबई : मुंबई महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांच्या वसाहतींसाठी पालिकेमार्फत ‘आश्रय योजना’ सुरू करण्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदस्य भाई गिरकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या धोरणांविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. याला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

आश्रय योजनेंतर्गत सुमारे २८ हजार सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करून सदनिका उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सद्यस्थितीत ३९ ठिकाणी असलेल्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास या अंतर्गत करण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. सफाई कामगारांच्या प्रश्नांविषयी शासन गंभीर असून या वसाहतीसंदर्भातील तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करण्यात येईल. सफाई कामगारांना सफाईची कामे करावी लागत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यांचे आयुर्मान कमी होत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाविषयी शासन गंभीर आहे. त्यामुळे त्यांना स्वच्छ वसाहती उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. तसेच सफाई कामगारांच्या मेडिक्लेमचा हप्ता भरण्यात आला नसल्यास तो तातडीने भरण्यात येईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.


@@AUTHORINFO_V1@@