‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेतून दुष्काळी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Mar-2018
Total Views |

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

 
 
 
मुंबई : गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनांमधून दुष्काळी जिल्ह्यातील कामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणववीस यांनी दिल्या. पावसाळ्यात या माध्यमातून जिल्ह्यांमधील पाणी साठ्यात वाढ होऊन शेतजमिनीलाही त्याचा फायदा होईल, असे ते म्हणाले. मृद व जलसंधारण विभागाच्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी गुरूवारी स्वयंसेवी संस्था, विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रतिनिधी यांच्याबरोबर संवाद साधून या योजनेसंबंधी चर्चा केली.
 
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि परिवर्तन करणारी योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे. यामुळे धरणे, तलाव, तळी पुनरुज्जीवित होऊन शेत जमीन सुपीक होत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वीपणे राबविल्यानंतर जुनी धरणे, तलावांमधील गाळ काढून ती पुनरुज्जीवीत करण्याच्या हेतूने हे अभियान राबविण्यात आले. यातून पाणीसाठा वाढण्याबरोबरच शेत जमिनीचा सुपिकता वाढणार आहे. या माध्यमातून उत्तम कार्य सुरू असून राज्य शासन या मागे खंबीरपणे उभे राहिल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
 
योजनेला तंत्रज्ञानाची जोड द्यावी
या योजनेची कामे करताना त्याला तंत्रज्ञानाची जोड द्यावी. झालेल्या प्रत्येक कामांचे बिग डाटा अॅनालिटिक्स प्रणालीप्रमाणे, डॉक्युमेंटेशन व मॅपिंग करावे. या कामासाठी संसाधनांचा आणि सामुग्रीचाही प्रभावी वापर करण्यात यावा. यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. तसेच लोकसहभागासह विविध घटकांना जोडून घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
 
@@AUTHORINFO_V1@@