कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यात आजचा टी-२० सामना कोलंबो येथील प्रेमदासा मैदानावर सुरु झाला असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार श्रीलंका मैदानावर फलंदाजी करण्यात उतरली आहे. सध्या श्रीलंका १०८ धावांवर ३ बाद अशा स्थितीत खेळत आहे.
श्रीलंकेसोबत झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला हार पत्करावी लागली आता आजचा सामना भारतासाठी महत्वाचा मानला जात आहे. भारतावरील विजयानंतर सध्या श्रीलंका गुणतालिकेत अव्वलस्थानी आला आहे. या तीरंगी मालिकेत भारताची सुरुवात खराब झाली असली तरी देखील भारताकडे अजून दोन सामने आहेत.
या सामन्यांमध्ये भारताने चांगली कामगिरी केली तर भारत ही मालिका जिंकू शकतो.