भारतीय अंडर १९ क्रिकेट संघावर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
भारतीय अंडर १९ क्रिकेट संघाने आज चौथा अंडर १९ क्रिकेट विश्वचषक जिंकला असल्याने सगळे भारतीय यावर आनंद व्यक्त करत आहे. तसेच या संघावर आता सोशल मिडियावर चहूबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय, खेळ, सिनेसृष्टी अशा विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली आहे.
 
 
 
 
 
बिग बी अमिताभ बच्चन यांनी सर्वप्रथम ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहे तसेच चार वेळा विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देश आहे अशी माहिती त्यांनी यावेळी ट्वीट करत दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघाचे ट्वीटरवरून कौतुक करत भारतासाठी ही मनाची बाब असल्याचे म्हटले आहे.
 
 
 
 
 
 
 
क्रिकेटपटू अश्विन, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बूमराह, युवराज सिंग, भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मुरली विजय यांनी सगळ्यांनी या संघाला शुभेच्छा दिल्या असून या क्षणाचा पूर्णपणे आनंद घ्या असे म्हटले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@