कर्जमाफी अर्जाची मुदत ३१ मार्चपर्यंत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Feb-2018
Total Views |



मुंबई :
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव कर्जमाफीसाठी अर्ज करता आले नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी १ मार्च ते ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्यास संधी दिली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ५४ लाख ७२ हजार ३११ अर्ज निकाली काढले असून त्यापैकी ४६ लाख ३५ हजार ६४८ खात्यांमध्ये पैसे जमा करण्यासाठी बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यापैकी ३० लाख कर्जमाफीची खाती व १६ लाख खाती प्रोत्साहन योजनेतील आहेत. आतापर्यंत १३ हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे. एकूण ६७ लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १३ लाख अर्ज तालुका स्तरिय समितीकडे पडताळणीसाठी पाठविले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@