केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टी-२० सामन्यातील शेवटचा सामना आज केपटाऊन येथे खेळला जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-२० सामने खेळले जाणार होते त्यातील आजचा शेवटचा सामना असणार आहे. त्यामुळे आजचा सामना कोण जिंकत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पहिले दोन सामने दोन्ही संघाने एक-एक असे जिंकले असल्याने आजचा सामना जो संघ जिंकेल तो संघ ही टी-२० ची मालिका जिंकेल. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभूत करून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली होती. भारताचे १८९ धावांचे लक्ष्य अवघ्या १८.४ षटकांतच दक्षिण आफ्रिकेने पूर्ण केले होते.
भारतीय वेळेनुसार हा सामना आज ९.३० वाजता सुरु होणार असून या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.