शेतकऱ्यांनी वनौषधी व दुग्‍ध उत्‍पादनाकडे वळावे – योगगुरू स्‍वामी रामदेव बाबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
रामदेव बाबा यांनी द्रोणाचार्याच्या भूमिकेतून शेतक-यांना मार्गदर्शन करावे – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : चंद्रपूर व विदर्भ परिसरातील शेतकऱ्यांनी एका पिकावर न राहता आता वनौषधी आणि दुग्ध उत्पादनाकडे वळावे. मला वनौषधींची गरज आहे. मी खरेदी करायला तयार आहे. यापुढील काळात शेतकरी बांधवांनी आर्थीक स्‍वालंबनाची वाट शोधत स्वत:ला व देशाला बळकट करण्याचे आवाहन योगगुरू स्‍वामी रामदेव महाराज यांनी आज येथे केले.
 
 
चंद्रपूर तालुक्यातील मुल येथे २०,२१ व २२  असे तीन दिवस योगगुरू रामदेव महाराज यांचे योगाभ्यास शिबीराचे आयोजन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. २०  फेब्रुवारीला दुपारच्या सत्रात आयोजीत शेतकरी मेळाव्याला ते संबोधीत करीत होते. या मेळाव्याला चंद्रपूर-गडचिरोली जिल्हातील हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. मेळाव्याच्या व्यासपीठावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, खासदार अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्‍यामहापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीष शर्मा, माजी आमदार अतुल देशकर यांची उपस्थिती होती.
 
 
यावेळी रामदेव महाराज यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा देश ऋषी आणि कृषीचा आहे. त्यामुळे आज बदलत्या काळात देशाचा सन्मान आणि महत्व टिकवून ठेवायचे असेल तर काही बदल शेतीतही करणे गरजेचे आहे. मला माझे पुढचे आयुष्य शेतक-यांच्या उत्थानासाठी खर्च करायचे आहे. त्यामुळे आता जे काही मला विकायचे आहे. त्यासाठी लगणारा कच्चा माल आपल्या शेतात घ्यायला सुरुवात करा. एका पिकावर आता शेतक-यांचे भले होणार नाही. त्‍यामुळे वनौषधी, दुग्‍ध उत्‍पादन याला शेतकरी बांधवांनी प्राधान्‍य द्यावे, असे आग्रही आवाहन त्यांनी केले. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@