राष्ट्रनिर्माणाची मुहूर्तमेढ शिवाजी महराजांनी ३५० वर्षापूर्वी रोवली होती -नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2018
Total Views |

 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांनी महाराजांविषयी आपले विचार प्रस्तुत केले. त्यात नमूद केले आहे की, राष्ट्निर्माणाची मुहूर्तमेढ शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वीच रोवली होती.
 
 
३५० वर्षानंतर देखील त्यांचे विचार आणि कार्य कालसुसंगत वाटतात, असे देखील या व्हिडीओमध्ये नमूद केले आहे. सर्वपंथसमभाव या महान परंपरेचा शिवाजीमहाराजांनी संपूर्ण आयुष्यभर आचरण केले. शिवाजी महाराजांकडे आपल्या देशात अनेक पिढ्यांपासून प्रेरणास्त्रोत म्हणून पहिले जाते. त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही हे देखील तेवढेच खरे आहे, असे मोदी यांनी आपल्या व्हिडीओद्वारे सांगितले.
 
 
आपण सर्वांनी समाजसेवेची प्रेरणा घेऊन शिवाजी यांच्याप्रमाणे सेवजी व्हावे, समाजाची सेवा करावी, असा संदेश त्यांनी शिव जयंती निमित्त दिला आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@