इंडस्ट्री ४.० मुळे रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Feb-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई :  रोजगाराच्या संधी या केवळ उद्योग क्षेत्रातच आहेत असे नाही. सेवा, व्यवसाय, ब्रँडिंग, पुरवठा या सोबतच शेती क्षेत्रातसुद्धा रोजगाराच्या असंख्य संधी आहेत. कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची सर्वच क्षेत्राला आवश्यकता आहे. देशात सध्या उद्योगाला पूरक वातावरण असून इंडस्ट्री ४.०  मुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक संधी निर्माण होतील असा सूर मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हर्जन्स 2018 या गुंतवणूकदारांच्या परिषदेत इंडस्ट्री ४.०  व भविष्यातील रोजगार या विषयावरील चर्चा सत्रात निघाला.
 
 
 
या चर्चासत्रास शिशिर जोशपात्रा, उन्मेष पवार, ट्रोन्ड ब्रेडसेन, सुमित्रो घोष, माधव चंचाणी व पराग सातपुते प्रमुख वक्ते म्हणूस उपस्थित होते.उद्योगाच्या विकासासाठी व वाढीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असून सरकार कौशल्य प्रशिक्षणावर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण होईल असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला. तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे मात्र तंत्रज्ञानाचा अतिवापर हा रोजगाराच्या मार्गातील अडथळा ठरू शकतो अशी भीती काही वक्त्यांनी व्यक्त केली.
 
अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीत काही बदल करणे काळाची गरज आहे. उद्योग व्यवसायाला लागणारे कौशल्य अभ्यासक्रमात समाविष्ट केली जावीत. काही उद्योग समूहांनी त्यांना लागणारे स्किल मॅन पावर मिळावे म्हणून विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू केल्याचे या चर्चासत्रात सांगण्यात आले. भारतात दरवर्षी तीन कोटी नवीन वाहने रस्त्यांवर येत असतात. या वाहनांसाठी असलेल्या सर्व्हिसिंग सेंटरसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. युवकांनी ही कौशल्ये आत्मसात केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे शेती क्षेत्रातसुद्धा रोजगाराच्या संधी आहेत. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व शेतीपूरक व्यवसाय या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील असा सूर या चर्चासत्रात निघाला. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन माधव चंचणी यांनी केले. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@