....ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागा संकटात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Feb-2018
Total Views |
 

 
 
नाशिक : नाशिकमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ’द्राक्ष पंढरी’अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर ढगाळ वातावरणामुळे विपरीत परिणाम होत आहे. काढणीला आलेल्या बागांचे नुकसान रोखण्यासाठी शेतकर्‍यांना द्राक्षबागा अंतिम टप्प्यात असताना फवारणीचा खर्च वाढला असून, शेतकरी चिंतित झाले आहेत.
 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिकमध्ये ढगाळ वातावरण असल्याने पावसाच्या भीतीने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. द्राक्षांवरील भुरीचे नियंत्रण करण्यासोबतच अवकाळी पाऊस झाल्यास काढणीला आलेले पीक कसे वाचवायचे, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. अंतिम टप्प्यातील बागा वाचविण्यासाठी द्राक्ष उत्पादक भुरी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारणीची खबरदारी घेत आहेत. चुकीच्या औषधांची फवारणी अथवा औषधाचे अधिक प्रमाण यामुळे निर्यातक्षम द्राक्षांची प्रतवारी घसरण्याचा धोका टाळण्याची कसरत शेतकर्‍यांना करावी लागत आहे. त्यामुळे शेतीतज्ज्ञांकडून द्राक्षबागांच्या अंतिम टप्प्यात योग्य औषध व औषधाचे प्रमाण याविषयी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. सल्फर वापरलेल्या बागेमध्ये जैविक नियंत्रण घटकांचा वापर शक्य तेव्हा करावा. जैविक नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्मा, बॅसिलस सबिटलीस आणि ऍम्पिलोमायसीस यांचा वापर शक्य आहे. तसेच फवारणीद्वारे पोटॅशियम व कॅल्शियमचा वापर केल्यास बुरशीनियंत्रणाला फायदा होत असल्याचा शेतकर्‍यांमध्ये समज आहे परंतु, सध्याच्या बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही औषध अथवा उर्वरक वापरताना शेतकर्‍यांनी सावध पावले उचलली पाहिजेत असे कृषीतज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
 
 
कृषितज्ज्ञांचा सल्ला
 
फवारणी करताना कमी कार्यक्षमतेपासून मध्यम कार्यक्षमतेची फवारणी यंत्रे वापरण्यासोबतच फवारणीमुळे मण्यांवर फवारणीचे द्रावण ओघळून येणार नाही अथवा फवारणीवेळी सल्फरचे डाग पडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@