‘बेलगंगा’च्या गाळप हंगामाचा शुभारंभ उद्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |

श्रीश्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांची उपस्थिती


चाळीसगाव : 
 
राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांनी विकत घेतलेला एकमेव साखर कारखाना म्हणून चर्चिला गेलेला व चेअरमन चित्रसेन पाटील यांच्यासह अंबाजी टीमच्या अथक परिश्रमातून सुरू होत असलेल्या भोरस ता. चाळीसगाव येथील बेलगंगा साखर कारखानाच्या गव्हाण पूजन व गळीत हंगामाला शुक्रवार 7 रोजी साडेदहा वाजता कारखाना कार्यस्थळावर शुभारंभ होणार आहे.
 
 
अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे राहणार आहेत. याप्रसंगी सिद्धेश्वर आश्रम बेलदारवाडीचे हभप ज्ञानेश्वर माऊली, परमपूज्य स्वामी केशवानंद सरस्वती यांची उपस्थिती लाभेल.कार्यक्रमाला जिल्ह्यातील मंत्री तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
 
 
उपस्थितीचे आवाहन बेलगंगा साखर कारखाना चेअरमन चित्रसेन पाटील, कार्यकारी संचालक नामदेव पाटील यांच्यासह संचालक प्रवीणभाई पटेल, दिलीप चौधरी, प्रेमचंद खिवसरा, माणिकचंद लोढा, दिनेशभाई पटेल, अरुण निकम, डॉ. एम. बी. पाटील, विजय अग्रवाल, अ‍ॅड. धनंजय ठोके, उद्धवराव महाजन, किरण देशमुख, अजय शुक्ला, सुशील जैन, अशोक ब्राह्मणकर, श्रीराम गुप्ता, सुजित वर्मा, रफिक शेख प्रशांत मोराणकर, अभय वाघ, डॉ. मंगेश वाडेकर, जगदीश पाटील, माजी व्हॉईस चेअरमन रवींद्र पाटील, नीलेश वाणी, निलेश निकम, एकनाथ चौधरी, हिंमत पाटील, डॉ. अभिजित पाटील, एम.एम. पाटील, शरद मोराणकर, प्रदीप धामणे, हिंमत पटेल, गोरख राठोड, जगदीश पाटील, डॉ. मोनिका पाटील, वर्षा महाजन, कुसुमताई भामरे, पन्ना लोढा यांच्यासह अंबाजी ग्रुपचे सर्व भागधारक व कर्मचार्‍यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@