“माझ्या निवृततीची अफवा कुठून आणि कशी पसरली हे मला माहित नाही, कोणत्यातरी रिकामटेकड्या मूर्ख व्यक्तीचे हे काम असावे.” असे लतादीदी याबाबत म्हणाल्या. अचानक दोन दिवसांपासून त्यांना निवृत्तीसंदर्भातील फोन आणि संदेश येण्यास सुरुवात झाली. असे त्यांनी सांगितले. ‘आता विसाव्याचे क्षण’ हे गाणे लतादीदींनी पाच वर्षांपूर्वी गायले होते. या गाण्याचा संबंध थेट त्यांच्या निवृत्तीशी लावण्यात आला असल्याचे लतादीदी म्हणाल्या. “निवृत्ती घेण्याचा विचार मी केलेला नाही. माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी गात राहेन”. असे लतादीदींनी स्पष्ट केले. एका वृत्त्तसंस्थेला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी ही अफवा फेटाळून लावली.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/