अयोध्येत झालेल्या या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्रातील १० महिला आणि २० पुरुष पैलवानांचा संघ गेला होता. यापैकी ५ कुस्तीपटूंनी पदकही कमावले. परंतु अयोध्येहून परतीच्या रेल्वे प्रवासात या कुस्तीपटूंची साधी जागादेखील आरक्षित केली गेली नव्हती. २५ तासंचा हा त्रासदायक प्रवास कुस्तीपटूंना शौचालयाजवळ बसून करावा लागला. या प्रवासादरम्यानचे फोटो यातील काही कुस्तीपटूंनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कुस्तीपटूंना हा त्रास सहन करावा लागत असताना अयोध्येला गेलेली पदाधिकारी मंडळींनी मात्र परतीचा प्रवास विमानाने केला.
महाराष्ट्रातील हे कुस्तीपटू रविवारी दुपारी साडेतीन वाजता फैजाबाद येथून साकेत एक्सप्रेसने परतीच्या प्रवासाला निघाले होते. पावणे पाच वाजता ही एक्सप्रेस मनमाड येथे पोहोचली. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राला पाच पदके मिळवून देणाऱ्या या कुस्तीपटूंवर अशी दुर्दैवी वेळ येणे. ही खूपच लांच्छनास्पद गोष्ट आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/