मुंबई : आर्थिक संकटात सापडलेली भारतातील प्रमुख विमान कंपनी जेट एअरवेजने आता आणखी एक निर्णय घेतल्याने वाद उफाळून आला आहे. यापुढे इकॉनोमी क्लासने जाणाऱ्या प्रवाशांना मोफत जेवण देणार नसल्याचे जेट एअरवेजने जाहीर केला आहे.
काही दिवसांपूर्वी जेट एअरवेजने कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे आपली बरीच उड्डाणे रद्द केली होती. त्याचा परिणाम जेट एअरवेजच्या शेअरवरही झाला होता. दरम्यान खर्चात कपात करण्यासाठी आता हे पाऊल उचलले जात आहे. इंधनदरवाढ, घसरता रुपया यांमुळे कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. गेल्या तिमाहीत कंपनीला १ हजार २६१ कोटींचा तोटा झाला होता.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/