बुलंदशहरातील एका गावात गोहत्या झाल्याची अफवा पसरली होती. गोहत्या झाल्याच्या संशयावरून काही आंदोलकांनी बुलंदशहरात हिंसक आंदोलन केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर तातडीने पोलीस या घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पोलीस आणि या आंदोलकांमध्ये चकमक झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीसांनी गोळीबार केला. पोलीसांनी केलेल्या या गोळीबारात एक तरुण जखमी झाला. ही बातमी पसरताच या संतप्त आंदोलकांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला. पोलीस स्टेशनवरील या हल्ल्यात पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे बुलंदशहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी अनेक पोलीसांना तैनात करण्यात आले आहे. बुलंदशहरात झालेल्या या हिंसक घटनेमुळे उत्तर प्रदेशातील औरंगाबादहून जाणारी रस्तेवाहतूक जहांगिराबादमार्गे वळविण्यात आली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/