एनडीएफबीच्या ९ दहशतवाद्यांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |



आसाम रायफल आणि जयरामपूर पोलिसांची कामगिरी

 

नवी दिल्ली : अरूणाचल प्रदेश या भारताच्या पूर्वेकडील राज्यातून ९ दहशतवाद्यांना घुसखोरी करताना पकडण्यात सीमा सुरक्षा दलाला यश आले आहे. घुसखोरी करणाऱ्या या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. भारतीय सेनेतील आसाम रायफल आणि जयरामपूर पोलिसांनी मिळून भारत-म्यानमार सीमेवर ही कारवाई केली.

 

भारताच्या पूर्वेकडील राज्यातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या अरूणाचल प्रदेशच्या सीमेलगत ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेले दहशतवादी हे नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड-सोंगबिजीत (एनडीएफबी) या दहशतवादी संघटनेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. म्यानमारमधील त्यांच्या कॅम्पमधून प्रशिक्षण घेऊन भारताविरोधी कारवाई करण्यासाठी हे दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये तीन महिलांचा समावेश असून त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात रायफल, पिस्तुले आणि काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@