कांदिवलीमध्ये अग्निकल्लोळ ; ४ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |



मुंबई : कांदिवलीतील दामू नगर येथे रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर चौघे जण होरपळल्याचे आढळून आले. या सर्वांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अंधेरीतील घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना ठरली.

 

राजू राधेशाम विश्वकर्मा (वय ३०), राजेश छोटेलाल विश्वकर्मा (वय ३६), भावेश वल्लभदास पारेख (वय ५१), सुदामा लालनसिंग (वय ३६) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. कांदिवलीच्या दामू नगर परिसरात रविवारी संध्याकाळी साडेचार वाजताच्या सुमारास कपडा कारखान्यात आग लागली. आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून ४ जणांना आपला जीव गमवावा लागला. या कापड कारखान्यात जीन्स बनविण्याचे काम चालते. कारखान्यात मोठया प्रमाणात कापड असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले होते. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला होता. अग्निशमन दलाने सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी शोध मोहीम घेतली असता चार मृतदेह आढळून आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@