जळगाव :
काँग्रेस पक्षातर्फे राफेल प्रकरणात मते जाणून घेतली आहे. त्यात विमान खरेदी कराराबाबत सत्यता जाणून घेण्याचे समजले. राफेल प्रकरणाचा निर्णय संसदेमधून व्हावा, असे प्रा.हेमंत चौधरी यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
काँग्रेस भवनात गुरुवारी पत्रपरिषदेत आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अशपाक पटेल (जामनेर), शक्ती सुरवाडे उपस्थित होते.
प्रा. चौधरी पुढे म्हणाले की, एक करार पूर्ण होत नसताच पंतप्रधान दुसार करार करतात. पक्षापेक्षा लोकशाही महत्त्वाचे असून संयुक्त संसदीय कमिटीद्वारे निर्णय व्हावा तसेच घोटाळा झाला की नाही हा देशाच्या संपत्तीचा प्रश्न असून तो निर्वाळा निवडणुकीच्या आधी व्हावा, असेही त्यांनी सांगितले.