काँग्रेस हा पाकीटमारांचा पक्ष : ओवेसी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |



हैद्राबाद : काँग्रेस हा पक्ष पाकीटमारांचा प्रश्न असल्याची जळजळीत टीका कट्टर इस्लामवादी पक्ष असलेल्या मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खा. असदुद्दिन ओवेसी यांनी केली. तसेच, काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी हे स्वयंघोषित ‘जानवेधारी हिंदू’ असून त्यांना मुस्लिमांच्या अडचणी, समस्यांची जाणीवही नसल्याची टीकादेखील त्यांनी केली.

 

तेलंगण विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मलकपेट येथील सईदाबाद येथे झालेल्या प्रचारसभेत असदुद्दिन ओवेसी बोलत होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असल्याचे सांगत तेव्हा काँग्रेस आणि स्वयंघोषित ‘जानवेधारी हिंदू’ कुठे होते, असा सवाल ओवेसी यांनी केला. राहुल गांधी यांना आमच्या अडचणी, समस्या यांची जाणीवही नसून राजमहालात त्यांनी आयुष्य व्यतित केले आहे. ते एक पर्यटक म्हणून भारतात येतात. ते कधी लाठीमाराला सामोरे गेला आहात का? त्यांच्या त्यांना कधी कोणी बोल लावले आहेत का? असे सांगत ओवेसी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसच्या सभेला लोकांना बसमध्ये बसवून गर्दी जमा केली जाते. सभेला आल्यावर त्यांना १०० रुपये आणि पाकीट दिले जाते, असाही गंभीर आरोप ओवेसी यांनी काँग्रेसवर केला.

 

तेलंगण विधानसभा निवडणुकीत विद्यमान सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस-तेलगु देसम विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी तिहेरी लढत आहे. या दरम्यान, एमआयएमची भूमिका महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. हैद्राबादसह लगतच्या प्रदेशात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय असून ही मते एमआयएमकडे गेल्यास काँग्रेस-तेलगु देसम तसेच टीआरएसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@