प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2018
Total Views |

मुंबई : सरकारच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसलोक संवादसाधून जाणून घेणार आहेत. त्यासाठी या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. जानेवारी २०१९ रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधणार आहेत.

 

केंद्र राज्य सरकारच्या विविध योजनांची राज्यात यशस्वीपणे अंमलबजावणी सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना (नागरी ग्रामीण), उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, सूक्ष्म सिंचन आणि मृदा परीक्षण सारख्या योजना अधिक गतीने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध जिल्ह्यांमध्ये आणि मंत्रालयातही या योजनांचा आढावा घेतला आहे. आता या विविध योजनेतील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री थेट संवाद साधणार असून जानेवारी रोजी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांशीलोक संवादकार्यक्रमाद्वारे याचा शुभारंभ होणार आहे.

 

मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची इच्छा असणाऱ्या आणि प्रधानमंत्री आवास योजना त्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या इतर पूरक योजना यांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले नाव, संपर्क क्रमांक-पत्ता आणि योजनेचा लाभ घेतल्याची माहिती [email protected] या ईमेलवर आणि ८२९१५२८९५२ या व्हॉटसॲप क्रमांकावर दि. २८ डिसेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन माहिती जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे. इच्छुक लाभार्थी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडेही दि. २८ डिसेंबरपर्यंत माहिती पाठवू शकतात, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@