केंद्र सरकारची राज्याला दुष्काळी मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |


 


मुंबई : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळावी, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. पंतप्रधानांनी या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना दिले. व्यवसाय सुलभता (इझ ऑफ डुईंग बिझनेस) निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली.

 

मुख्यमंत्रांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. तसेच राज्य सरकारने विविध पातळ्यांवर केलेल्या उपाययोजनांबाबतही त्यांना सांगितले. या परिस्थितीवर मात करून जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यास तातडीने मदत करावी, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यावर सकारात्मक आणि तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिले.

 
 
 

याआधी दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने केंद्राकडे ७ हजार ९६२ कोटी ६३ लाखांच्या मदतीची मागणी केली होती. त्यावर ही मदत लवकर मिळावी, अशी मागणी मुयख्यमंत्र्यांनी यावेळी केली. धारावी पुनर्विकासासाठी रेल्वेची जमीन प्राप्त करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. प्रधानमंत्र्यांनी या दोन्ही मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@