...तर छापील टेलिफोन बिलांना राम राम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |



मुंबई : प्रदूषण टाळण्यासाठी आणि झाडांची होणारी कत्तल थांबवण्यासाठी छापील बिलांऐवजी ई-बिलांचा पर्याय जास्तीत जास्त अंमलात आणावा अशी मागणी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटीकडे पर्यावरण प्रेमींनी केली होती. त्यानंतर त्यांनी देशभरातील नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्या होत्या. छापील बिलांचा पर्याय स्वीकारार्ह ठरेल का यासंदर्भात अहवाल जारी करून १० डिसेंबरपर्यंत मत व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ९०००हून अधिक ग्राहकांनी ट्रायकडे पत्रे पाठवली आहेत.

 

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे नऊ हजारहून अधिक ग्राहकांनी ई-बिल पर्यायाला पाठिंबा दिल्याचा अंदाज आहे. ट्रायने छापील बिले बंद करून सकारात्मक पाऊल उचलले तर ते म्युचुअल फंड, बँका, इतर छापील बिले देणाऱ्या क्षेत्रांसाठी मार्गदर्शक ठरू शकेल. आलेले ई-मेल व सूचना पडताळणीसाठी आणि त्यावर विचार करण्यासाठी आणखी पंधरा दिवस ते महिन्याभराचा काळ ट्रायला लागू शकतो. त्यानंतर नव्या वर्षामध्ये बिलांसाठी अधिक पर्यावरणस्नेही मार्ग ग्राहकांना मिळू शकतो, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

 

कागदासाठी लागणारी झाडे, पाणी, तसेच ही बिले पाठवण्याचा खर्च या सगळ्यामध्ये यामुळे बचत होऊ शकते. त्यामुळेही याबद्दल सकारात्मक निर्णयाची आशा निर्माण झाली आहे. "या पाठिंब्यानंतर ट्राय याबाबत सकारात्मक विचार करेल. सिक्कीम, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, दिल्ली अशा विविध राज्यांमधील नागरिकांना याबद्दल माहिती पोहोचवण्यात आली होती. ग्राहकांना छापील बिले पाठवणे कंपन्यांसाठी बंधनकारक राहू नये किंबहुना छापील बिलांची गरज व्यक्त केलेल्या नागरिकांनाच तसे बिल पाठवण्यात यावे असे मत सुमारे २५ स्वयंसेवी संस्थांनीही व्यक्त केले आहे." असे मिशन ग्रीन मुंबईचे संचालक शुभाजीत मुखर्जी यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@