'ते राज ठाकरे आहेत, गांभीर्याने घ्यायची गरज नाही'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |


नवी दिल्ली : आपल्या व्य़गचित्रातून राजकीय परिस्थितीवर टिपण्णी करणाऱ्या राज ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खास शैलीत टोला लगावला आहे. निवडणूक निकालानंतर राज यांनी भाजपवर टीका करत राहुल गांधी यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

 

नवी दिल्ली येथे या टिकेवर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे त्यांचे मित्र असल्याचे सांगत त्यांची राजकीय वक्तव्ये आणि व्यंगचित्रे गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगितले. राहुल गांधी आता पप्पू नव्हे परमपूज्य झाले आहेत. असे वक्तव्य निवडणूक निकालानंतर राज यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस यांनी राज यांचा समाचार घेतला.

 

राज ठाकरेंना काही कामे नाहीत, ते फक्त आपली मते मांडतात. त्यांना कोणीही गांभिर्याने घेऊ नका. राज सरकारविरोधात बोलणारच, ते बोलतात ती त्यांची मतेच असतात. त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@