काँग्रेसतर्फे जिल्ह्यात जल्लोष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

 
भुसावळ : 
 
तीन राज्याच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश येथे विजय प्राप्त केल्यामुळे मंगळवारी 11 रोजी शहर काँग्रेस कमिटीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानवाला अभिवादन करून फटाक्यांची आतषबाजी केली तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
 
यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष रवींद्र निकम यांनी आनंद व्यक्त करत आता खरे जनतेचे अच्छे दिन हा नारा लावून नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली.
 
यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रवींद्र निकम, रहीम कुरेशी, भगवान मेढे, नईम शेख, काँग्रेस युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा डॉ. सुवर्णा गाडेकर, रिटा सिल्व्हेस्टर, रेखा बोराडे, विलास खरात, राजू डोंगरदिवे, सलोनी शिरसाठ, वानखेडे, संतोष साळवे, सुनील दांडके, प्रा. संदानशिव, सुरेश शेटे, विजय सनांसे, कलीम बेग, बाळू सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
वरणगावात काँग्रेसतर्फे फटाक्यांची आतषबाजी
 
वरणगाव- मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विधानसभेत दणदणीत विजय संपादन केल्याने वरणगाव शहरातील काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने बसस्थानक चौकात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
 
यावेळी मल्लू पहेलवान, प्रा. मनोज देशमुख, के. बी. काझी, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, अनिल पाटील, शैलेश बोदडे, राजू पालीमकर, राजेश काकानी, ज्ञानेश्वर पाटील, सीताराम गुमळकर, शैलेंद्र ससाने, जयंता शुरपाटणे, शहराध्यक्ष अशफाक काझी, पप्पू काझी, आबीद कच्ची, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक विष्णू खोले, गजानन वंजारी, राजेश चौधरी, समाधान चौधरी, गोपाळ पाटील, वाय. आर. पाटील, दीपक मराठे, अतुल चौधरी, मनोज चव्हाण, पप्पू जकातदार आदी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
एरंडोलमध्येही काँग्रेसतर्फे ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पेढे वाटप करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@