मुक्ताईनगर :
येथे 8 रोजी झालेल्या लोकन्यायालयात 230 प्रकरणाचा निपटारा झाला. 61 ग्रामपंचायतीमधील 230 प्रकऱणा मध्ये तडजोड होऊन 5 लाख 28हजार वसूल करण्यात आले.
यावेळी गट विकास अधिकारी डी.आर. लोखंडे उपस्थित होते. तसेच संबंधित ग्रामपंचायतचे वसुलीसाठी विस्तार अधिकारी बैरागी, विस्तार अधिकारी सपकाळे, वरिष्ठ लिपिक चंद्रकांत बिर्हाडे व बारी आणि सर्व ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
प्रामुख्याने अंतुर्ली 60 हजार 154 रु. कोथळी 46 हजार 675, चिंचोलं 34 हजार 600, हरताळे 32 हजार 334, कुर्हा 34 हजार 186 मेहुण 25 हजार 200, उचंदा 25 हजार 900 रुईखेड 24हजार 101 या ग्रामपंचायतीनी वादातील वसुली प्रकरणांमध्ये चर्चेअंती चांगली वसुली केली. याबद्दल दिवाणी न्यायाधिशांनी सर्वांचे कौतुक केले.