विशेष म्हणजे ‘अग्नी-५’ हे बॅलेस्टिक क्षेपणस्त्र भारतातच तयार करण्यात आले आहे. ‘अग्नी-५’ या क्षेपणस्त्राची ही सातवी चाचणी होती. ‘अग्नी-५’ या क्षेपणस्त्रामुळे जगातील शक्तिशाली अशा पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. जगभरात सध्या फक्त अमेरिका, रशिया, चीन आणि फ्रान्स अशा चार देशांकडेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. या देशांच्या नावांमध्ये आता भारताच्या नावाचाही समावेश झाला आहे.
हे क्षेपणास्त्र १७ मीटर लांब आणि दोन मीटर रुंद आहे. ५० टन एवढे त्याचे वजन आहे. ‘अग्नी-५’ या क्षेपणस्त्रामुळे अनेक देश या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येऊ शकतात. यामुळे आता भारत कोणत्याही जगातील देशास चोख प्रत्युत्तर देण्यास समर्थ असणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/