...तर जनतेच्या हातात अधिकाऱ्यांची बढती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : आगामी वर्षापासून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बढतीत सर्वसामान्य जनता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. कारण केंद्र सरकार यावर आधारित धोरण तयार करत आहे. जनतेने दिलेल्या कामाच्या मूल्यांकनावर एखाद्या सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बढती निश्चित करण्यात येणार आहे. ज्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याच्या कामाचा दर्जा चांगला असेल त्यांनाच बढती मिळेल. १ एप्रिल २०१९ पासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामांचे मूल्यांकन करण्याची प्रणाली लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

यापूर्वी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामांचे मूल्यांकन व्हावे. त्यामध्ये जनतेचा सहभाग असावा आणि त्यानुसार त्यांना बढती देण्यात यावी, अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आला होता. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत. नव्या आदेशानुसार, सरकारी कामकाजाबाबत जनतेचे अनुभव कसे आहेत? जनता अधिकाऱ्यांना किती गुण देतात? याची माहिती सार्वजनिक केली जाणार आहे.

 

नव्या प्रणालीमध्ये अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना गुण किंवा अंक देण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. याची नोंद अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या कार्मिक अहवालात केली जाणार आहे. सामान्य जनतेशी थेट संबंध असणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या बढतीत ८० टक्के प्रमाण सामान्य जनतेने दिलेल्या प्रतिसादाचे असणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@