जळगाव :
येथील निमजाई फाउंडेशनतर्फे शहरात होत असलेल्या सैनिक भरतीसाठी जिल्ह्यातून आणि राज्यातून आलेल्या युवकांना मोफत भोजनाची सुविधा करण्यात आली.
सुमारे दोन हजार युवकांना भोजन देण्यात आले. ही व्यवस्था महात्मा गांधी उद्यान व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ करण्यात आली होती. अनेक युवकांनी संस्थेला धन्यवाद देत ऋणभावना व्यक्त केली.
यासाठी परिश्रम संस्थेच्या अध्यक्षा शितल भगवान पाटील, भुषण बाक्षे, मोहिनी भंगाळे, सुनिल माळी, महेश पाटील, भारती माळी, कुणाल कोलते, शिवकन्या कहाणे, अर्चना पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.