‘पिंजरा’ हा डॉ. श्रीराम लागूंचा त्या काळात प्रचंड गाजलेला सिनेमा होता. ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ हे गाणेही त्या काळात प्रचंड गाजले होते. आजही ते अनेकांच्या स्मरणात आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने या गाण्यात अभिनेत्री संध्या यांची भूमिका साकारली आहे. अमृताने संध्या यांच्याप्रमाणेच या गाण्यात हावभाव करण्याचा प्रयत्न केला आहे. अमृताने केलेला हा प्रयत्न प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? हे पाहण्यासाठी सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे. येत्या ८ नोव्हेंबर रोजी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/