दिवाळीत रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. न्यायालयाच्या या निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात पोलिसांची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. अभ्यंगस्नानाच्या दिवशी मध्यरात्री या दोन अज्ञात तरुणांनी फटाके फोडून या निर्देशाचे उल्लंघन केले. फटाके फोडण्याची वेळ न पाळल्याने गुन्हा दाखल करण्याची ही राज्यभरातील पहिलीच घटना आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/