नंदुरबार : कृषी विस्ताराला आत्माअंतर्गत शेतकरी मित्रांचा सहभाग होण्याचे जिल्हास्तरीय आत्मा नियामक मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आवाहन केले.
रंगावली सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आत्मा नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी अर्चना पठारे आत्माचे उपसंचालक एम.एस. रामोळे, खरडे, अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील उपविभागीय अधिकारी नंदुरबार एस.एस. वळवी शहाद्याचे व्ही. व्ही. जोशी सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.