चाळीसगाव : दिवाळीनिमित्त शहरातील बाजारपेठ हाऊसफुल्ल झाल्या होत्या. दिवाळीच्या सणासुदीनिमित्त विविध ठिकाणाहून खरेदी करण्यासाठी नागरिकांची दिवसभर गर्दी पाहायला मिळाली.
मात्र, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारातील उलाढालीवर त्याचा परिणाम झाल्याचे जाणवले. नागरिकांनी पूजा साहित्य, इतर किरकोळ वस्तू खरेदीला प्राधान्य दिले. मात्र, कपड्यांचा बाजार थंड असल्याचे दिसून आले.