लग्नसमारंभात २३ जणांना विषबाधा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2018
Total Views |


मुंबई: वांद्रे येथील समाज मंदिर हॉलमध्ये एका लग्न कार्याच्या भोजनानंतर २३ जणांना जेवणातून विषबाधा झाली आहे. या सर्वांना व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये ११ पाहुण्यांचा समावेश आहे.

 

लग्न कार्यात भोजनानंतर २३ जणांना अचानक उलट्या आणि मळमळ सुरु झाली. त्यांना तात्काळ व्ही.एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. विश्वभध झालेल्यांमध्ये ३ मुले आणि ११ पाहुण्यांचा समावेश आहे. ३ लहान मुले आणि आठ महिलांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. इतर रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@