अभाविपची निवेदनाद्वारे मागणी
जामनेर - महाराष्ट्रात अनेक तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासनाने परीक्षा शुल्क माफ करावा, या मागणीसाठी शनिवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तालुकाप्रमुख मनोज जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव टिळेकर यांना निवेदन देण्यात आले.
शेतकरी, मजूरी करणार्या नागरिकांवर उपासमारीची वेड आली असून त्यांना तत्काळ शासनाने अध्यादेश काढून दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थाना परीक्षा शुल्क परत करावा अशी मागणी केली आहे.
यावेळी शहरमंत्री अक्षय जाधव,आसिफ पिंजारी, शुभम मोरे, प्रवीण महाजन, विवेक महाजन, भूषण अहिरे, स्वप्नील पंडित, विनय हडप, व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.