तीन दिवसात गिरणातून आवर्तन सोडणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे दुष्काळ पीकपाहणीप्रसंगी सूतोवाच
 
 
 
जळगाव - जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता येत्या तीन दिवसात गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागातील पीकपाहणीदरम्यान शुक्रवारी सांगितले.
 
 
दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री ना. पाटील यांनी शुक्रवारी चाळीसगाव तालुक्यातील खरजाई, तरवाडे, भडगाव तालुक्यातील तांदलवाडी, पाचोरा तालुक्यातील हडसन, सामनेर, जळगाव तालुक्यातील वडली, वावडदा या गावांना भेटी देऊन तेथील शेतकर्‍यांशी संवाद साधला.तसेच परिसरातील पीक परिस्थिती व दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.
 
 
 
पालकमंत्री ना. पाटील यांनी चाळीसगाव तालुक्यातील खरजाई, तरवाडे या गावास भेट दिली असता या गावातील एकाच विहिरीवर इतर दोन गावांसाठी पाणीपुरवठा योजना आहे. त्यामुळे गावास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता प्रत्येक गावासाठी स्वतंत्र विहीर घेण्याची सूचना प्रशासनाला दिली.
 
कपाशीवरील बोंडअळीमुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाने आतापर्यंत 3 हजार 300 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. या नुकसान भरपाईचा 640 कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता राज्य शासनाने कालच जिल्हाधिकार्‍यांकडे दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
 
 
पालकमंत्र्यांसमवेत पाहणी दौर्‍यात आ. उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जि.प.सभापती पोपटतात्या भोळे, सा.बां.अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक कृषी अनिल भोकरे यांच्यासह खरजाई, तरवाडे येथे चाळीसगावचे प्रांत शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे, एन. सी.पाटील, पाचोर्‍याचे प्रांत राजेंद्र कचरे, तहसीलदार सी.एम.वाघ, बीडीओ दीपाली कोतवाल, तहसीलदार बी. ए. कापसे होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@