..तर गुन्हेगार उमेदवारांना आजीवन निवडणूक बंदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |



नवी दिल्ली: गुन्हेगार उमेदवारांना आजीवन निवडणूक बंदी आणावी अशा आशयाच्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगाई हे या याचिकेवर सुनावणी करत आहेत. जर ही याचिका मंजूर झाली तर अनेक गुन्हेगार मंत्री आणि आमदार यांना राजकारणाला रामराम ठोकावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी वकील अश्विन उपाध्याय यांनी आरोप सिद्ध झालेल्या राजकारण्यांना आयुष्यभर निवडणूक लढवता येऊ नये अशी याचिका दाखल केली होती.

 

१९५२च्या रिप्रेझन्टेशन ऑफ पीपल्स अॅक्टच्या कलम ८ नुसार आरोप सिद्ध झालेल्या आमदार खासदारांना १० वर्ष निवडणूक लढवता येत नाही.त्यानंतर ते तुरुंगात राहून देखील निवडणूक लढवू शकतात. हे कलम असंविधानिक असल्याचा दावा उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता. तसेच ज्या उमेदवारांना शिक्षा झाली आहे त्यांना कधीच निवडणूक लढवता येऊ नये अशी याचिका त्यांनी दाखल केली होती. राजकारण्यांविरोधातील खटले फास्ट ट्रॅक कोर्टात टाकावे का यावर सुनावणी सुरू होती. पण गोगोई यांनी पुन्हा या मुद्यावर सुनावणी होईल अशी गुरुवारी घोषणा केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@