लष्कराकडून वर्षात दोनशे दहशतवाद्यांचा खात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018
Total Views |
 
 

श्रीनगर : वर्षभरात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांची पळता भुई थोडी केली आहे. मंगळवारी काश्मिर खोऱ्यात केरन सेक्टर भागात दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. वर्षभरात दोनशे दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आले आहे. दरम्यान या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

या वर्षी काश्मीरमध्ये जवानांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम उभी केली. यात लष्कर--तोयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन, जैश--मोहम्मदच्या दहशदवाद्यांना ठार करण्यात आले आहे. याचा मोठा झटका जैश--मोहम्मदला दहशतवादी संघटनेला बसला आहे. त्यांचे सुमारे ५० दहशतवादी ठार झाले आहेत तर हिज्बुलच्या ४० टक्क्यांहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. लष्कर--तोयबाचे ३३ टक्के दहशतवादी यंदाच्या वर्षात मारले गेले.

 

भारतीय जवानांनी काश्मीर खोऱ्यात दुहेरी कारवाई केली. सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसह स्थानिक दहशतवाद्यांचेही आव्हान होते. रमजानच्या पवित्र महिन्यात मोदी सरकारने काश्मीरच्या दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवली होती. त्या काळात दहशतवाद्यांनी डोके वर काढले होते. त्यामुळे सरकारवर टीकाही झाली. मात्र, रमजान संपताच लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@