श्रीलंकेत राजकीय अस्थिरता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |


 


कोलंबो: श्रीलंकेत गेल्या काही दिवसांपासून राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून पंतप्रधान वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष सिरीसेना यांनी श्रीलंकन संसद बरखास्त केली. पंतप्रधानपदासाठी पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे संसद बर्खास्तीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष सिरीसेना यांच्या या निर्णयामुळे श्रीलंकेच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. राष्ट्रपती सिरीसेना यांनी शुक्रवारी एका वटहुकूमावर स्वाक्षरी करून २२५ सदस्य संख्या असलेली श्रीलंकन संसद बरखास्त केली. त्यामुळे आता श्रीलंकेत मध्यावधी निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

दरम्यान, श्रीलंकेत जानेवारी महिन्यात निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. रानिल विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावरून बरखास्त करून सिरीसेना यांनी राजपक्षे यांना पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे श्रीलंकेत संविधानिक पेच निर्माण झाला होता. २२५ सदस्य संख्या असलेल्या श्रीलंकन संसदेत बहुमतासाठी ११३ सदस्य संख्येची आवश्यकता आहे. राजपक्षे यांच्याकडे ही बहुमताचा आकडा नसल्याने राष्ट्राध्यक्षांनी संसद बर्खास्तीचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.

 

न्यायालयात दाद मागणार

 

दरम्यान, राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती युनायटेड नॅशनल पार्टीच्या मंगल समरविरा यांनी दिली. तसेच आम्ही आपले बहुमत सिद्ध करू, तसेच न्यायालयातही याविरोधात लढा देऊ, गरज भासल्यास निवडणुकांनाही आम्ही सामोरे जाण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@