१. भारतीय वायूसेना ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी वायूसेना आहे. भारतीय वायूसेनेत एकूण १,७०,००० कर्मचारी कार्यरत असून १,५०० लढाऊ विमाने आहेत.
२. जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांमध्ये वायूसेनेचा सातवा क्रमांक लागतो. भारतीय वायूसेना ही जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांतील हवाई दलांच्या तुलनेत जास्त शक्तिशाली आहे.३. ‘नभ: स्पृशं दीप्तम’ हे वायूसेनेचे ब्रीदवाक्य भगवतगीतेच्या ११ व्या अध्यायातून घेण्यात आले आहे.४. तजाखिस्तान या देशातही भारतीय वायूसेनेचे एअर फोर्स स्टेशन आहे.५. ६,७०६ मी उंच सियाचिन ग्लेशिअरवर देखील वायूसेनेचे एअर फोर्स स्टेशन आहे.६. उत्तराखंड येथे पुरस्थिती दरम्यान वायूसेनेने केलेल्या बचावकार्याची जागतीक विक्रमात नोंद करण्यात आली होती.७. ‘ऑपरेशन राहत’ हे भारतीय वायूसेने केले जगातील आजवरील सर्वात मोठे नागरी बचावकार्य आहे.८. दिल्ली येथे वायूसेनेचे स्वत:चे संग्रहालय आहे.९. लढाऊ विमानांसाठी वैमानिक म्हणून वायूसेना महिलांना नेहमीच प्रोत्साहन देत आली आहे. वायूसेनेत सध्या ३०० महिला वैमानिक कार्यरत आहेत.
१०. वायूसेनेची संपूर्ण भारतात ६० पेक्षा अधिक हवाईतळ आहेत.