काश्मीर आमचाच: राजनाथ सिंह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2018
Total Views |


 

 
 
लखनऊ: "जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग असून तो भारताचाच राहिल. कोणतीही शक्ती त्याला आमच्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही." असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी पाकिस्तानला खडसावून सांगितले. ते लखनऊ येथे सीआरपीएफच्या रॅपिड अॅक्शन फोर्सच्या २६व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले, "काश्मीर आमचा आहे, आमचा होता आणि आमचाच राहिल. जगातली कोणतीच शक्ती त्याला आमच्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही."
 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कार्यक्रमात सीआरपीएफच्या कार्याचे कौतुक केले. “दंगल, कायदा आणि सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न त्याचबरोबर मदत आणि बचाव कार्यांमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स अग्रेसर असते. काश्मीरी लोक आणि दहशतवाद्यांशी योग्य प्रकारे हाताळणी करुन नियंत्रण मिळवण्याचे कार्य सीआरपीएफने करत आहेत." असे यावेळी राजनाथ सिंह म्हणाले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@