अजमेर : मी देशासाठी पंतप्रधान असेल मात्र भाजपासाठी मी आजही सामान्य कार्यकर्ताच आहे. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजमेर येथील सभेत बोलताना केले. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या गौरव यात्रेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, "काँग्रेसने देशावर ६० वर्ष सत्ता गाजवली मात्र देशाचा विकास करण्यात ते सपशेल अयशस्वी ठरले. तसेच विरोधक म्हणून देखील ते अयशस्वीच आहेत."
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/