मथुरा : २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मथुरामध्ये महायज्ञाचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी या महायज्ञाचे आयोजन केले आहे. हे महायज्ञ दहा दिवस सुरु राहणार असून भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मंत्री तसेच मोठमोठे साधु-संत उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
१० ऑक्टोबरपासून या यज्ञाला सुरुवात होणार असून मोदी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या महायज्ञाचे आयोजन करण्यात येणार आहे. यमुना नदीच्या काठावर हे होमहवन करण्यात येणार आहे. यावेळी बोलताना मोदी ट्रस्टचे अध्यक्ष पवन पांडे यांनी सांगितले की, " पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी शतचंडी महायज्ञात मातीचे लाखो दिवे तयार केली जाणार आहेत. त्यासाठी अखंड मंत्रपठण करण्यात येईल. यातून निर्माण होणारी दिव्य शक्ती २०१९ला मोदींना पुन्हा पंतप्रधानपदीचा विजय निश्चित करेल."
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/