भाजपाला मिळालेल्या या भरघोस यशाबद्दल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरवरून आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याबद्दल अमित शाह यांनी त्रिपुरातील जनतेचे आभार मानले.
भाजपाचा मित्रपक्ष ‘इंडिजिनियस पीपुल्स ऑफ त्रिपुरा’ने ग्राम पंचायतीच्या ९ जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेस आणि माकपाला ग्राम पंचायतीच्या चार जागांवरच समाधान मानावे लागले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/