या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती अग्निशमन दलातील सूत्रांकडून देण्यात आली आहे. परंतु ५० ते ६० झोपड्या या भीषण आगीत जळून खाक झाल्या आहेत. गेल्यावर्षीदेखील ऑक्टोबरमध्ये याच झोपडपट्टीला आग लागली होती. त्या आगीत अनेक झोपड्या जळाल्या होत्या. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते. त्यापूर्वी ४ मार्च २०११ रोजीही गरीबनगर झोपडपट्टीला अशीच भीषण आग लागली होती. याच परिसरात वारंवार आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/