पनवेलला उभे राहणार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Oct-2018
Total Views |

 

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय


 

 

मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यामध्ये ७ हजार सौर कृषिपंप लावण्यास देखील मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
 
 
 

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय

 

1) संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील ४० टक्के ते ७९ टक्के दिव्यांगांना ८०० रुपये तर ८० टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांगांना एक हजार रुपये प्रतिमाह अर्थसहाय्य देण्यात येणार.

 

2) नागपूर येथे राज्यस्तरीय तर औरंगाबाद, अकोला, धुळे आणि सोलापूर येथे महाविद्यालयस्तरीय विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा स्थापण्यात येणार.

 

3) मत्स्यव्यवसाय विकासासाठी केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत ससून गोदी बंदराच्या नूतनीकरणास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

 

4) किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत २०१७-१८ या हंगामामध्ये खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रतिक्विंटल दहा रुपये भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून तीस रुपये वाढीव भरडाई दर देण्यात येणार.

 

5) वस्तू व सेवा कर परिषदेने शिफारस केल्यानुसार महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम-२०१७ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

6) महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ अधिनियम-२०१४ मधील विविध कलमांत सुधारणा करण्यासाठी विधेयक सादर करण्यास मान्यता देण्यात आली.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@