भारताने उडवले पाकी सैन्याचे मुख्यालय!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Oct-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : वारंवार इशारे, सूचना, तंबी देऊनही न सुधारणार्‍या आणि वारंवार भारताच्या हद्दीत येऊन कुरापती काढणार्‍या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्याने थेट पाकिस्तानच्या लष्कराचे प्रशासकीय मुख्यालय उडवून पाकला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

 

जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागात नियंत्रण रेषेपलीकडे (एलओसी) असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या प्रशासकीय मुख्यालयाला तोफांचा मारा करून उडवल्याचे व्हिडिओज हाती लागले असून काही वृत्तसंस्थांनी सोमवारी याबाबतचे वृत्तदेखील प्रसारित केले आहे. दि. २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यदलांवर भ्याड हल्ला केला होता, ज्यामध्ये ३ भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. तसेच, त्यानंतर नियंत्रण रेषेजवळ परिस्थिती तणावाची होती. मात्र, त्यानंतर पुन्हा २३ ऑक्टोबर रोजी पाकी सैन्याने पूंछ भागात असाच भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने थेट पाकी सैन्याचे मुख्यालयच उडवल्याची माहिती आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओजमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर धूर येताना दिसत आहे. मोठमोठे धुराचे लोट यामध्ये स्पष्टपणे दिसत असून सदर कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्याच्या या मुख्यालयाचे जबरदस्त नुकसान झाले असल्याचे म्हटले जात आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@