राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की ''आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की, १५४ पीएसआयना प्रशिक्षण घेतल्यानंतरही न्यायालयाच्या निर्णयामुळे रुजू करुन घेणे शक्य होत नव्हते. या संदर्भात आम्ही निर्णय घेतलेला आहे. हे कुठलीही पदोन्नती नाही. हे सर्वसाधारण परिक्षेतून आलेले पीएसआय आहेत. त्यांनी पूर्ण प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्यांना आम्ही नोकरीमध्ये सामावून घेत आहोत," असे मुख्यमंत्री म्हणाले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/